श्रीक्षेत्र नामदेव नर्सी ते मुंबई प्रर्यंत समारोप महाराष्ट्र दिन रोजी,
जलकुंभ कळस यात्राचा प्रारंभ

जलकुंभ कळस यात्राचा प्रारंभ 28 एप्रिल रोजी श्रीक्षेत्र नामदेव नर्सी ते मुंबई प्रर्यंत समारोप महाराष्ट्र दिन रोजी होईल-उपमुख्यमंत्री अजित पवार जलकुंभ यात्राचा आगमन झिरो फाटा येथे 28 एप्रिल रोजी होईल-आ. राजेश विटेकर चा संवाद मेळावा
परभणी शहरातील अक्षदा मंगल कार्यालयात आज शनिवार 26 एप्रिल रोजी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या उपस्थितीत संवाद मेळाव्याला राष्ट्रवादी कार्यकत्यांची रिकॉर्ड ब्रेक गर्दी झाली होती. सर्व प्रथम महापुरूषांना उपमुख्यमंत्री अजित पवार सह मान्यवरांनी अभिवादन केले. या मेळाव्यात 400 कार्यकत्यांनी राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला. व तसेच जलकुंभ कळस यात्राचा प्रारंभदिनांक 28 एप्रिल रोजी श्रीक्षेत्र नामदेव नीं येथुन होईल. ही यात्रा 28 एप्रिल रोजी पुर्णा तालुक्यातील झिरो फाटा येथे आगमन होईल, अशी ही माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व आ. राजेश विटेकर यांनी दिली. या व्यसपीठावर माजी पालकमंत्री नवाब मालिक, प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, आ. विक्रम काळे, माजी आ. जटलीया, आ. राजेश विटेकर, शहर महानगर जिल्हाध्यक्ष प्रताप भैय्या देशमुख, पुर्णाचे शहाजी देसाई, युवा नेते सुरेश नागरे, युवा नेते अक्षय भैय्या देशमुख, आ. डॉ. रत्नाकर गुट्टे, अनिल
नखाते, महिला आघाडीच्या भावना नखाते, विकास लंगोटे, जाकेर लाला, नंदा राठोड, जयश्री खोंबे, राजकुमार लेमाडे, रितेष काळे, रोहन सामाले, किरण तळेकर, युवा नेते शंकर भागवत, रामेश्वर आवडगंड, नगरसेवक व आदी मान्यवर उपस्थित होते. या मेळाव्यात ना. अजित दादा पवार म्हणाले की आपल्या देशात 1991 वर्षात मध्ये स्वर्गिय प्रधानमंत्री राजीव गांधी यांची घोषणा केली होती की प्रर्यंतेक युवक व युवतीच्या हातात संगणक येईल. आज त्याच्यामुळे संगणक मध्ये क्रांती घडुन आनली असुन युवक व युवतीना आमच्या महायुती सरकारमुळे संगणकांच्या विविध योजनामुळे रोजगार मिळत आहे. आमच्या सरकांनी युवकांना कर्ज देण्याची व्यवस्था केली व शेतकऱ्यासाठी आनेक योजना आनल्या आहेत आणि महानगरपालिका, जिल्हा परिषद व नगरपालिक आगामी निवडणुक लागणार असुन कार्यकत्यांनी एकत्र येवुन सर्व निवडणुक जिंकणे, आसे मत ना. अजित दादा पवार यांनी मांडले. या संवाद मेळाव्यात राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकत्यांची रिकॉर्ड ब्रेक गर्दी झाली होती.