चलो आझाद मैदान
एस सी आरक्षण उपवर्गीकरणासाठी जन आक्रोश मोर्चात लाखोंनी सामील व्हा-आमदार सुनील कांबळे
सोलापूर दिनांक 23 एप्रिल आज ऐतिहासिक अशा हुतात्म्याच्या सोलापूर नगरीत सकल मातंग समाजाची 20 मे 2025 रोजी आझाद मैदानावर निघणाऱ्या जनआक्रोश मोर्चाच्या नियोजनाच्या बैठकीसाठी सकल मातंग समाज सोलापूर जिल्ह्याची महत्त्वाची बैठक हॉटेल प्रथम सात रस्ता सोलापूर या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती.या बैठकीला मार्गदर्शन करताना पुणे छावणीचे आणि विधिमंडळातील एक अभ्यासू आमदार सुनील कांबळे हे म्हणाले की,अनुसूचित जातीतील आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्यासाठी 20 मे 2025 रोजी सकल मातंग समाजाच्या बॅनरखाली आझाद मैदानावर “एकच लक्ष आझाद मैदानावर पाच लक्ष” या घोषणेने लाखो बांधव उपस्थित राहणार आहेत.महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यात अशा प्रकारच्या बैठका आयोजित करून समाज संघटीत करून आरक्षण उपवर्गीकरणाचे महत्त्व सांगून जनआक्रोश मोर्चा यशस्वी करण्यासाठी सर्वस्व पणाला लावून मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान त्यांनी केले. सर्वच जिल्ह्यामध्ये आमदार, खासदार, माजी आमदार ,माजी खासदार सर्वच काम करीत असल्याचे प्रतिपादन आमदार सुनील कांबळे यांनी केले. या ठिकाणी पुढे बोलताना ते म्हणाले की सोलापूर शहरातील 16 मातंग वस्त्या आणि सोलापूर जिल्ह्यातील अकरा तालुक्यात जाऊन तेथे समाजातील नेते कार्यकर्ते संघटनेचे प्रमुख यांना एकत्र करून तालुक्यातील गावनिहाय समाजाची संख्या पाहून जनाक्रोश मोर्चाचे वातावरण निर्मिती करून इच्छुक समाज बांधवांच्या याद्या तयार करून त्यांना आझाद मैदानाकडे घेऊन येण्यासाठीच्या सुविधा सर्व सकल मातंग समाजातील नेते कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यावतीने करण्याचे आव्हान आमदार सुनील कांबळे यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोलापूरचे सुपुत्र आणि माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे यांनीही आरक्षणाचे महत्व येणाऱ्या भावी पिढीसाठी एक जबाबदारी म्हणून आपण एकत्र येऊन या पवित्र कार्याला हातभार लावावा आणि हे जनआक्रोश मोर्चा यशस्वी करावा अशा प्रकारचे आव्हान त्यांनी केले.सोलापूर जिल्ह्याचे सुपुत्र आणि माजी मंत्री प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे यांनी अध्यक्षयी भाषणात या बैठकीला संबोधित केले ते बोलताना पुढे म्हणाले की आरक्षण उपवर्गीकरण हे मातंग समाज आणि वंचित जातीसाठी वरदान ठरणारे असून यासाठी आपण सर्वांनी ताकदीने आणि उमेदीने लढा दिला पाहिजे असेही भावनिक आव्हान प्राध्यापक ढोबळे सरांनी केले आरक्षण उपवर्गीकरणाची चळवळ मातंग समाजासह अनेक वंचित जातींना त्यांचे परिवर्तन करणारी असून या परिवर्तनाच्या लढाईत आपण सर्वांनी रस्त्यावर आले पाहिजे असेही ते म्हणाले,
सकल मातंग समाजाचे प्राध्यापक पंडित सूर्यवंशी यांनी आरक्षण उपवर्गीकरण ही वंचित आणि मातंग समाजासह समाजाला संजीवनी ठरणारी आहे असे ते म्हणाले उदगीर पॅटर्न महाराष्ट्र मध्ये सगळीकडे चळवळीच्या क्षेत्रात राबविला पाहिजे तरच आझाद मैदानावर 20 मे ला लाखोच्या संख्येने समाज बांधव जनआक्रोश मोर्चा उतरतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री T S क्षीरसागर सर यांनी केले तर कार्यक्रमाची रूपरेषा व स्वागत संयोजक तथा राज्य समन्वयक श्री सुरेश पाटोळे यांनी मांडली.आभार प्रदर्शन किशोर जाधव सर यांनी व्यक्त केले, या बैठकीसाठी सर्वत्र सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन आमदार सुनील कांबळे प्राध्यापक लक्ष्मण ढोबळे व माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे यांच्यासह उपस्थित नगरसेवक संघटनेचे प्रमुख यांनी केले.या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती सोलापूर मातंग समाज शहर अध्यक्ष श्री सुहास शिंदे ,सामाजिक कार्यकर्ते समाधान आवळे,युवा नेते महादेव भोसले ,युवा नेते गोविंद कांबळे ,युवा नेते सुधाकर पाटोळे,युवा नेते सुनील भाऊ खवळे आदी मान्यवर उपस्थित होते.बैठक यशस्वी करण्यासाठी रोहित खिलारे, ओंकार पाटोळे, सतिश बगाडे, रजनी डोलारे, श्रीकांत बोराडे, अजित पवार, आदी कार्यकर्ते परिश्रम घेतले,