डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे गाणे ट्रॅक्टर वर मोठया आवाजात का लावले म्हणून,
गेवराई तालुक्यातील आमला/वाहेगाव येथील तीन बौद्ध समाजातील युवकांना जबर मारहाण.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे गाणे ट्रॅक्टर वर मोठया आवाजात का लावले म्हणून गेवराई तालुक्यातील आमला/वाहेगाव येथील तीन बौद्ध समाजातील युवकांना जबर मारहाण.
औरंगपूर येथे ट्रॅक्टर वर कामगार म्हणून काम करणारे बौद्ध समाजातील आमला/वाहेगाव येथील ऋषिकेश नारायण खरात,पृथ्वीराज विष्णू खरात आणि करण भारत साबळे हे तीन तरुण काम करीत असताना त्यांनी ट्रॅक्टर वर बाबासाहेबांची गाणे लावली होती, हे सहन न झाल्याने तेथील काही लोकांनी या तिघांना जातीय द्वेष्यातून जबर मारहाण केली,
मारहाण करणारांचे उग्र स्वरूप पाहून आणि आपले आता काही खरे नाही म्हणून रात्री चं त्या ठिकाणी ट्रॅक्टर व मोटार सायकल तेथेच सोडून पळ काढला.
एवढ्या रात्रीचे ते तिघे हि तरुण पायी पायी चालत बीड येथे आले.
नंतर तेथील काही कार्यकर्त्यांनी किशन तांगडे यांना संपर्क करून मदत करण्याची विनंती केली.
घटनेचे गांभीर्य ओळखून किशन तांगडे हे तेथे गेले आणि पीडिताचे सांत्वन करून त्यांना धीर दिला.लागलीच ग्रामीण पोलीस स्टेशन चे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड साहेब यांच्या सोबत चर्चा केल्या नंतर रितसर गुन्हा दाखल झाला.
यावेळी किशन तांगडे यांच्या सोबत तीन हि पीडित कुठूबा चे नातेवाईक आणि भाऊसाहेब कांबळे,नवनाथ डोळस,भास्कर जावळे,रामेश्वर खळगे सह चळवळीतील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.