आपला जिल्हा आपली बातमी

बहीण” योजनेत E-KYC अडचणीवर तोडगा निघणार – मंत्री अदिती तटकरे यांचे आश्वासन

बहीण” योजनेत E-KYC अडचणीवर तोडगा निघणार – मंत्री अदिती तटकरे यांचे आश्वासन.

 

धाराशिव जिल्हा प्रतिनिधी/ नयुम शेख.

 

राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी E-KYC प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे. मात्र, या प्रक्रियेदरम्यान अनेक लाभार्थीना OTP (वन टाइम पासवर्ड) वेळेवर न मिळणे आणि विविध तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागणे अशी गंभीर समस्या उभी राहिली आहे.

 

या पार्श्वभूमीवर राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी समाज माध्यमाद्वारे महिलांना आश्वस्त केले आहे. त्यांनी सांगितले की,

 

* या तांत्रिक अडचणीची गंभीर दखल शासनाने घेतली असून,

 

* तज्ञांच्या मदतीने समस्या सोडवण्याचे काम सुरू आहे, * लवकरच या अडचणींवर उपाययोजना करून E-KYC प्रक्रिया अधिक सुलभ व सुकर केली जाईल.

 

“महिला लाभार्थीनी काळजी करण्याची गरज नाही. अल्पावधीतच ही समस्या सोडवून सर्वांसाठी प्रक्रिया सहज आणि सोपी करण्यात येईल,” असे स्पष्ट आश्वासन मंत्री तटकरे यांनी दिले.राज्य शासनाने महिलांच्या आर्थिक व सामाजिक सबलीकरणासाठी “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजना सुरू केली आहे. पात्र महिलांना या योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य मिळण्यासाठी E-KYC करणे आवश्यक आहे. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे अनेक लाभार्थीना OTP न मिळाल्याने त्यांचे काम अडखळत होते.

 

आता मंत्री तटकरे यांनी दिलेल्या आश्वासनामुळे लाभार्थीमध्ये दिलासा निर्माण झाला असून, पुढील काही दिवसांत ही प्रक्रिया सुलभ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button