Uncategorizedअमरावती शहर

वाघोडा येथे शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या  

 

वाघोडा येथे शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या  

 

नांदगाव खंडेश्वर तालुका प्रतिनिधी सागर सव्वालाखे

 

आज दिनांक 23 जुलै 2025 रोजी दुपारी 5 वाजता नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील वाघोडा येथील शेतकरी तुकारामजी भलावी वय वर्ष 68 यांनी त्यांच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सतत शेतीमध्ये होणारे नुकसान व पिकाला न मिळालेले भाव यामुळे त्यांनी आत्महत्या केली. सरकारने कर्जमाफी करणार म्हणुन घोषणा केली पण न केलेला सातबारा कोर्याला मुख्य कारण आहे अशी चर्चा गावाकर्यांकडून व्यक्त होत आहे. त्यांच्या कडे 4 एक्कर शेती आहे. त्यांच्या मागे 2 मुले व 1 मुलगी (मोठा मुलाचे निधन झाले आहे) 3 नातू व पत्नी एवढा मोठा आप्त्यपरिवार आहे. त्यांची पत्नी सुद्धा सेवाग्राम हॉस्पिटल वर्धा येथे भरती आहे. त्यांच्या या निधनाने वाघोडा गावात शोककळा पसरली आहे.

24 News Network

ताज्या बातम्या घडामोडी बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क 9022978588

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button