शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेस कमिटीचा तहसीलदारांना घेराव
माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात मोर्चा
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेस कमिटीचा तहसीलदारांना घेराव
माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात मोर्चा
नांदगाव खंडेश्वर प्रतिनिधी सागर सव्वालाखे
https://youtu.be/I93hh0bKB9s?si=OaGMJD_1HNZJ7qmX
माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात नांदगाव खंडेश्वर तालुका कमिटीच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध समस्या घेऊन नांदगाव खंडेश्वरच्या तहसीलदार अश्विनी जाधव यांचा घेराव करण्यात आला. स्थानिक विश्रामगृह येथून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. या मोर्चामध्ये तालुक्यातील काँग्रेस नेत्यांसह शेकडो कार्यकर्ते सहभागी होते. विविध समस्याचे निवेदन तहसीलदार अश्विनी जाधव यांना देण्यात आले.
यात शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाप्रमाणे त्वरीत कर्ज माफी द्यावी. नियमीत कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान त्यांच्या खात्यावर जमा करावे, घरकुल, सिंचन विहीर तसेच वैयक्तीक लाभार्थी रोजगार हमी योजनेतील ४ ते ६ महिन्यापासून रखडलेले अनुदान तातडीने शेतकरी व मजुरांच्या खात्यामध्ये जमा करण्यात यावे. सन २०२४-२५ बात सोयाबीन पिकाला अतीवम्यासा भरपाई त्वरीत शेतकर्याच्या खात्यात जमा करावी. पिक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची पिक विमा रकम त्वरीत विधी करा सोयाबीन तर, कापुस, चना या पिकांना उत्पादन खर्चानुसार भाव देण्यात यावा आणि अनुदान त्वरीत वितरीत करावे. कृषी पंपाकरिता विजपुरवठा रात्री ऐवजी दिवसा करण्यात यावा. सोबतच पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील दोर्षीवर कडक कारवाई करण्यात यावी. यासह विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले. यावेळी प्रशासनातील सर्व अधिकारी उपस्थित होते.