बार्शी तालुक्यात बस अपघात; खराब बसमुळे अपघात, एसटी महामंडळ जबाबदार ?

परांडा तालुका प्रतिनिधी गोपाळ शिंदे
बार्शी तालुक्यात बस अपघात; खराब बसमुळे अपघात, एसटी महामंडळ जबाबदार ?
परांडा तालुका प्रतिनिधी गोपाळ शिंदे
बार्शी तालुक्यातील फपाळवाडी आणि तावडी या गावांच्या मधोमध एका बसचा अपघात झाला. बसच्या उजव्या बाजूच्या पाठीची पिन निघाल्यामुळे चालकाने ब्रेक दाबल्यानंतर बस उजव्या बाजूला पलटी झाली. या अपघातात काही प्रवासी जखमी झाले असून, सुदैवाने कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही.
अपघातग्रस्त बसचा क्रमांक एमएच ११ बीएल ९३३५ असून, स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. जखमी प्रवाशांना प्राथमिक उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. प्रशासनाकडून या अपघाताच्या कारणांची चौकशी सुरू असून, वाहनाच्या देखभालीतील त्रुटीमुळे हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
सुदैवाने मोठी दुर्घटना टळली असली तरी प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एसटी महामंडळाच्या हलगर्जीपणामुळे खराब बस रस्त्यावर धावत असल्याने अपघातांचे प्रमाण वाढत आहे. प्रवाशांनी किती दिवस जीव धोक्यात घालून प्रवास करायचा?
जर एसटी महामंडळ खराब बस प्रवाशांसाठी उपलब्ध करून देत असेल आणि वाहक-चालक त्याची नीट तपासणी न करता प्रवास घडवत असतील, तर याला जबाबदार कोण? जखमी प्रवाशांची यात नेमकी काय चूक? यापुढे अशा धोकादायक वाहनांचा प्रवासासाठी वापर करायचा का नाही, याचा गंभीर विचार करण्याची वेळ आली आहे.